03 March 2009

!!!! भारत एक्सप्रेस !!!!

नमस्कार मंडळी !

शब्धागंध ची मैफिल खुप छान जमली आहे आणि अशीच चालू राहुदेत हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना ....!

!!! **** !!! तुमच्या सगळयांच्या माहितीसाठी !!! **** !!!

भारत एक्सप्रेस्सला आता परतीचे वेध लागले आहेत ! ........

सिंगापुर मधील " महाराष्ट्र मंडळाचे प्रेमाचे कारशेड " आणि " शब्धागंधाचा साथ " यांच्या अमूल्य आठवणीचां ठेवा मनाशी

बांधून आपल्या सगळयांचा निरोप घेत आहे..........आणि मार्च २४ ला सिंगापुर वरुण प्रयाण करणार आहे !

आपला,
दत्तात्रय निकम

मी मराठी

ता.क: सांगा आता कसे जगायाचे ! नव्याने लिहावी लागेल ....हा ! हा ! ! हा !

02 March 2009

First Family Get Together In Singapore

Archive : 31/Dec/2006

Dear Friends,

This is the first time, I am out of India to Singapore.

Here I am staying with my one old friend, and I spend almost one month here.My experience in Singapore in Mixed one.Some times I do likes the infrastructure and the policies of Singapore government.Some times some things I really don,t like..............

I am very fortunate that I got an opportunity to Visit our office collegue house and the way they welcomed us was a memorable moments.

I really like that they are still preserved an INDIAN COMMUNITY CULTURE.


It was one of the good experience in Singapore.I always like to attend such family as well as social function.Rest evrybody has their own choices to celebrate and decribes.But I think my way is something different...................

मी कोण होणार? : भाग १

प्रेषक आनंदघन ( शुक्र, 02/22/2008 - 15:40) .



खाली दिलेले आत्मकथन नाही. पन्नास वर्षांपूर्वी खेड्यात वाढलेल्या मुलांच्या अनुभवाची मिसळ आहे. त्यात चवीसाठी पदरचे तिखटमीठ घातले आहे.



मी मोठ्ठा होणार!

कांही लोक मोठे झाल्यावर कोण होणार हे लहानपणापासूनच ठरवतात म्हणे. ते ध्येय गांठण्याचा रस्ता त्यांच्या नाकासमोर असतो आणि ते हलतडुलत आरामात तिथपर्यंत जाऊन पोचतात. धन्य आहे त्या लोकांची! हल्ली तर आज जन्माला आलेले पोर मोठेपणी सॉफ्टवेअर इंजिनियर नाही तर टीव्ही प्रोग्रॅमचा अँकर होणार अशी भविष्ये वर्तवणारे ज्योतिषी निघाले आहेत. कांही आईवडील आपल्या मुलामुलींची करीयर्स त्यांच्या जन्माआधीपासून ठरवून ठेवतात आणि त्यासाठी सारे नियोजन करतात.



माझ्या लहानपणी असले कांही नव्हते. "ज्याने चोच दिली आहे तो चारासुद्धा देईल" अशा विचाराने सगळा भार देवावर टाकून पालकवर्ग आपल्या मुलावर कसे चांगले संस्कार करता येतील इकडे लक्ष पुरवायचा. सर्व वडील मंडळींच्या पाया पडायचा रिवाज होता. तेंव्हा ते "मोठा हो, शहाणा हो." असे आशीर्वाद देत असत. कधी कधी "तू मोठा झाल्यावर कोण होणार आहेस?" असे कोणी विचारले तर "मी मोठ्ठा होणार" असे उत्तर देऊन मी मोकळा होत असे. सगळे जण जर मला मोठा होण्याचा आशीर्वाद देत होते तर मी मोठाच होणार असा माझा साधा तर्क होता. "किती मोठा होणार?" या प्रश्नावर "आभाळाएवढा!" यापेक्षा चांगले दुसरे उत्तर काय देणार?



खरोखरच आपल्याला पाहिजे तेंव्हा मारुतीरायासारखे अगडबंब होता आले असते आणि आमच्या गांवातला मेरुगिरीलिंगप्पाचा डोंगर तळहातावर ठेऊन आकाशात उडता आले असते तर किती मज्जा आली असती असे वाटायचे. पण असले चमत्कार देवबाप्पाच करू शकतो हे कधीतरी समजले आणि त्या स्वप्नाचा नाद सोडावा लागला. अखेर कुठल्या तरी मोठ्या माणसासारखे आपणही मोठे व्हावे अशी माफक इच्छा मनात डोकावू लागली.



या मोठ्या माणसांची यादी मात्र रोजच्या रोज बदलत जायची. कधी महात्मा गांधी सर्वात मोठे वाटायचे तर कधी पंडित नेहरू, कधी नेताजी सुभाषचंद्र बोस तर कधी वीर सावरकर यांचे आकर्षण वाटायचे. हे राष्ट्रीय नेते झाले. सर आयझॅक न्यूटन आणि लुई पाश्चर यांसारखे महान शास्त्रज्ञ, मुकेश आणि रफीसारखे लोकप्रिय गायक, विजय हजारे व लाला अमरनाथ यांसारखे खेळाडू अशी नाना क्षेत्रातली मोठी माणसे डोळ्यासमोर येत जात असत. जसजशी ज्ञानात भर पडत गेली तसतशी ही यादी लांबत गेली. पण या सगळ्या मोठ्या लोकांच्या गर्दीत एक ओळखीचा चेहेरा ठळकपणे दिसायचा तो माझ्या वडिलांचा!



हे सगळे मोठे लोक नेमके काय काम करतात याची जशी मला माहिती नव्हती तसेच माझे वडील घरातून बाहेर गेल्यानंतर काय करतात याची देखील सुतराम कल्पना नव्हती. त्यामुळे त्यांच्या कार्याची तुलना करता येणे माझ्या बालबुद्धीला अशक्यप्राय होते. त्यातून लोकमान्य टिळक किंवा विनू मांकड यांची मला भीती वाटण्याचे कारण नव्हते, पण वडिलांचा धांक होता. त्यामुळे ते जास्तच मोठे वाटत असण्याची शक्यता आहे.



एकदा मी एका तीन चार वर्षांच्या बडबड्या चिमुरडीला विचारले, "तुझे बाबा काय काम करतात?"
"आंघोळ करतात, जेवण करतात, झालंच तर माझ्याशी खेळतात." तिने उत्तर दिले.
"म्हणजे ते दिवसभर घरीच असतात कां?" मी खोदून विचारले.
"नाही. दिवसभर ते ऑफीसात जातात." तिने सांगितले.
"ऑफीसमध्ये ते कसले काम करतात?" तिच्या सामान्यज्ञानाची परीक्षा घेत मी विचारले.
"तिथं ना, ते सगळी कामे करतात. झाडू लावतात, भांडी घासतात, कपडे धुतात, वाळत घालतात, स्वैपाक करतात वगैरे वगैरे." तिने निरागसपणे बाबांच्या अब्रूचे धिंडवडे उडवले.



तिच्या इवल्याशा शब्दकोषात 'काम' या शब्दाच्या अर्थाची एवढीच व्याप्ती तोपर्यंत जमा झालेली होती. ही व्याप्ती जन्मभर वाढतच असते. "मी इथे किती काम करतो ते माझ्या बॉसला समजतच नाही." असे गार्žहाणे नव्याण्णऊ टक्के चाकरमाने करतात तर "मी घरी किती काम करते ते माझ्या नवर्žयाला कळत नाही." असे शंभर टक्के महिलांना वाटत असते.



असे असतांना मोठ्ठी माणसे काय काम करतात हे मला बालवयात कसे समजणार? "मोठा झाल्यावर तू काय करणार?" असे कोणी विचारलेच तर "ज्या गोष्टी मोठ्ठी माणसे करतात त्या मी पण करणार." असा माझा हजरजबाब तयार असे. ही पुस्तकांतली मोठी माणसे काही प्रत्यक्षात आपल्याला कधी भेटत नाहीत आणि आपल्या वास्तव जगात मात्र जे लोक स्वतः कांहीच न करता दुसर्žया लोकांनी केलेल्या कामाचे श्रेय उपटतात त्यांना बाकीचे लोक मोठे म्हणतात हे सत्य समजायला उभे आयुष्य घालवावे लागते.



संग्रह ......

दत्तात्रय निकम
मी मराठी

12 February 2009

दहशतवाद ! ....................???

नमस्कार मंडळी ! वरील विषयबदल माझे मत थोडक्यात !!
मी काही प्रतिक्रीयाच्या सारांश माज्या मतांसाठी घेतला आहे. विचाराचे आणि विचार मंड्णायाचे स्वातंत्र हा सर्वाचा हक्क आहे यात काही वाद नाही, पण विचाराचे मुद्दे आणि त्याचे आकलन यावरून मात्र वाद होतील यात काही दुय्यम मत कोणाचे असेल असे मला वाटत नाही....असो !

=========================================================================
ARUN MANOHAR KAKA : आपण ज्या समाजाचे घटक आहोत, त्या पारड्यातले लोक भगतसिंहाला नक्कीच क्रांतिकारी मानत असतील, ह्या विषयी मला तरी शंका नाही. मग विरुद्ध बाजूने त्याला काही नावे ठेवली, तर आम्ही हिरहिरीने त्याचा निषेध करु हेही बरोबरच आहे.( क्रांतिकारी मानत असतील....अगदी बरोबर काका ! आणि लोक आजही मानतात ).

=====================================================================

SACHIN BHIDEJI : थोडक्यात दहशतवादी हा स्वार्थासाठी उठाव करतो, तर क्रांतीकारी हा देशासाठी, जनतेसाठी, स्वराज्यासाठी लढत असतो. तेव्हां क्रांतीकारकाची वैचारिक बैठक ही दहशतवाद्याच्यापेक्षा केव्हांही थोरच असणार हे उघड आहे, नव्हे ती असतेच. त्यांची तुलना करणेच योग्य नाही.( अगदी बरोबर ! यात काही वादच नाही)

========================================================================
HEMANT KADAM SAN : (relativity) संकल्पना ठीक आहे, पण Good intensions च्या आणि additional circumstantial dimension मुळे दहशतवाद ही या case मध्ये relative concept रहात नाही. याला भले कोणी biased view म्हणो. अशा प्रकारच्या वादांमध्ये प्रस्थापित संकल्पनांची (इथे भगतसिंग हा देशप्रेमी ही) बाजू घेणं हे बूर्ज्वा ठरणं आणि विरुद्ध विचार करणं हे पुरोगामी ठरणं हा दोष संभवतो. असो.
दहशतवाद हा कुठल्याही पारड्यात नकारात्मकच आहे and will always be looked upon as derogatory remark / adjective. ( बरोबर ! जर मुळ कल्पनाचा बदलणार असेल तर त्याचा काही उपयोग नाही )

=======================================================================
वरील विचायाशी मी सहमत आहे
VRUNDA TAI : राज्यकर्त्यांच्या भुमिकेप्रमाणे इतिहासाची पुस्तके पण बदललेली आपण पाहिलीच.
शेवटी ह्या सर्वातून उरतो एक महत्वाचा प्रश्न...की आपण स्वत: काय मानतो? मी,भगतसिंगाना क्रांतीकारीच मानते. ( महत्वाचा प्रश्न...की आपण स्वत: काय मानतो?........अगदी बरोबर )
========================================================================
थोडक्यात !! काही उदा.
1) पावसाचे पाणी आणि नळाचे पाणी ! : जर नळाने विचार केला तो मोठा तर ते चुकीचे आहे की नाही ? पावस ( SOURCE) आहे, नळ हे एक माध्यम (Median) आहे.

2) भगतसिंग (भारतीयांचे क्रांतिकारी ) आणि कसाब (....मिशन जेहादच स्वघोषित क्रांतिकारी ! भारतीयांसाठी दहशतवादी)

असे अनेक दाखले देता येतील परन्तु ! नको ! मी म्हणुन काही बदलणार नाही जेव्हा आपण म्हणुन प्रयन्त्न करू तर कदाचित काही बदल घडतील असे मला वाटते ! तर सांगायचा मुद्दा एवढाच की जिथे विचार तिथे प्रतिक्रिया येणारच ....?? पण या विचार किवा त्यांच्या प्रतिक्रिया जर का काही नविन कल्पना किवा प्रेरणा निर्माण करणार असेल तर विचार थोर आहेत असेल विचार जरुर असावेत परन्तु जर ह्यातून जर काही निश्पन होणार नसेल तर मला असे वाटते की प्रेरणादायक विचार असलेले बारे त्यातून नविन काही शिकता येईल आणि पुढे जाता येईल.जर सर्वाना माझे मत पटले असेल तर विनंती की हा विषय एथेच थाबवलेला बरा .......!

मला वाटते माझे थोडक्यात ! जरा जस्ताचा थोडक्यात झाले आहे तर मग आता रजा घेतो..........

आपला

दत्तात्रय निकम
मी मराठी !

17 October 2008

क्रिकेटचे आराध्य दैवत...........सचिन रमेश तेंडुलकर

!! नमस्कार मित्रानो !! तसा आपला परिचय फार कही नविन नाही परंतु थोडक्यात में स्वतः एक क्रिकेट खेळणारा व क्रिकेट बदल प्रेम असणारा तुमच्यासारखाच आहे त्यात कही नविन नाही. पण माला आज माझे क्रिकेट धावांचे आराध्य दैवत...........सचिन रमेश तेंडुलकर याबद्दल थोडक्यात सांगायचे आहे.तसा सचिन तेंडुलकर अणि क्रिकेट हा संगम कही जुना नाही परतु आज जो सचिन ने जो विश्व पराक्रम केला आहे त्याबदल तुम्हा अह्म्हा आणि सर्वे क्रिकेट चाहत्याच्यावातिने !!! हार्दिक अभिनंदन आणि सुभेछा " व्यक्त करावयाच्या आहेत. सचिन ने आयुष्यात असे अनेक पराक्रम केले आणि करीत रहो हीच इश्वरचरनि प्रार्थना !!!!!!!!!!!!!





सचिन आला रे ! आला !




आज सचिन ने ब्रायन लारा (११९५३) नावाचा एक " क्रिकेट चा हिमालय" ज्याने आधुनिक कसोटी क्रिकेट मधे सर केला होता त्याला आता सचिन तेंडुलकर ने सर केले आणि सचिन आता १२०२७ वर आहे आणि अजुन किती मला खरचा माहित नाही ??



सचिन हा सगळ्यांचा आवडता क्रिकेटपटु तर आहेचा पण तो बहुतेंकाचा प्रेरणा स्थान पण आहे.आह्मी सचिनबघून खुप काही शिकलो आणि शिकत राहु आणि पुन्हा एकदा सचिन तेंडुलकर !!! हार्दिक अभिनंदन !!!!

आपला,
दत्तात्रय निकम
मी मराठी आणि एक क्रिकेट प्रेमी